मुबई ( प्रतिनिधी) : गेले अनेक दिवस विद्यार्थी भारती अंतिम वर्षाच्या परिक्षेसंदर्भात यूजीसीच्या विरोधात लढा देत आहे. लाखो विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात टाकणाऱ्या या युजीसीला भावना शून्य माणुसकी व मेलेलं धड म्हणून रविवारी अमावस्येच्या रात्री विद्यार्थी भारतीच्या कार्यकर्त्यांनी युजीसीची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. “विद्यार्थी त्रस्त है,युजीसी मस्त है” अशी घोषणाबाजी विध्यार्थ्यांनी दिली.विद्यार्थी हा कोरोनाच्या महामारीमुळे  अडचणीत सापडला असून, परीक्षा देण्याच्या मानसिकतेत नाहीत हे सरकरला व युजीसीला का कळत नाही?  विद्यार्थी भारतीच्या राष्ट्रीय अध्यक्षा मंजिरी धुरी, राज्यध्यक्षा पूजा मुधाने यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *