वीजेच्या कडकडाटामुळे कल्याणात टिव्ही फ्रीज जळाले 

कल्याण (प्रतिनिधी) : वीजेच्या कडकडाटामुळे व मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. वीजेच्या कडकडाटाचा जबर फटका कल्याण पूर्वेतील चिचंपाडा परिसरातील नागरिकांना सहन करावा लागला आहे. वीजेच्या कडकडाटामुळे शेकडो घरातील टिव्ही सेटअप बॉक्स फ्रीज फॅन आदी वस्तू जळाल्याचा प्रकार घडला आहे.
चिंचपडा परिसरातील साईसहारा अपार्टमेंट विंग, श्रीकृपा चाळ के सी कॉम्पलेकस सारानगर या इमारतीतील इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जळून खराब झाल्या आहेत सुमारे ६० ते ७० रहिवाशांच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जळाल्या असल्याने त्याचा रहिवाशांना आर्थिक् भुर्दंड सहन करावा लागणार आहे  अशी माहिती स्थानिक रहिवाशी शिवाजी चौगुले यांनी दिली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *