ठाणे, नवी मुंबईत मनाई आदेश

ठाणे : लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवार दि. 2 एप्रिलपासून नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होत आहे. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्या चहुबाजूने 100 मीटर परिसरात कलम 144( 2) अन्वये पोलीस आयुक्त ठाणे शहर विवेक फणसळकर यांनी मनाई आदेश दिले आहेत. या अन्वये या परिसरात कोणत्याही पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते , प्रतिनिधी यांना उमेदवारी अर्ज दाखल करतांना सभा, बैठक, पत्रकार परिषद आदी कार्यक्रम घेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. तसेच उमेदवारी अर्ज दाखल करतांना उमेदवार व त्यांचे समवेत चार व्यक्तिंनाच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कक्षात प्रवेश देण्यात येईल व कार्यालय परिसरात फक्त तीन वाहने आणण्याची परवानगी देण्यात येत असल्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी कळविले आहे. या मनाई आदेशाचा भंग केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला
तसेच नवी मुंबईतही निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या सर्व पोलीस स्टेशन हद्दीत 27 मे पर्यंत कलम 144अन्वये मनाई आदेश दिले आहेत.सदरचे आदेश पोलीस आयुक्त नवी मुंबई संजय कुमार यांनी दिले आहेत. या मनाई आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुध्द कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
़़़़़

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *