प्लॅनिंग करा !  बँका सलग चार दिवस राहणार बंद ! 
मुंबई :  तुमची महत्त्वाची कामे असतील तर ती लवकरच आटोपून घ्या. कारण चार दिवस सलग बँका बंद राहणार आहेत. 28 एप्रिलला चौथा शनिवार, 29 एप्रिलला रविवार, 30 एप्रिलला बुद्धपोर्णिमा आणि त्यानंतर 1 मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त बँकेचे कामकाज बंद राहणार आहे.
यामुळे नागरिकांना याआधीच बँकेची कामे करण्यासाठी बँकेकडे धाव घ्यावी लागणार आहे. या चार दिवसांत आर्थिक देवाण-घेवाण करण्यासाठी ग्राहकांना एटीएमचा पर्याय उपलब्ध असणार आहे. त्यामुळे धावपळ होऊ नये यासाठी अगोदरच प्लॅनिंग करून घ्या. 2 मेपासून पुन्हा बँका पूर्ववत सुरू होणार आहेत.
**

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *