शेतक-यांचे मंत्रालयासमोर भाजी फेकून संताप ..बीएमसी अधिकारी आणि पोलीस हप्ता मागत असल्याचा आरोप

मुंबई – भाजी विक्री करणा-या शेतक- यांनी आज मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर भाजीपाला फेकून आंदोलन केलं. बीएमसीचे अधिकारी आणि पोलीस हप्ता मागत असल्याचा आरोप त्या शेतक- यांनी केला. उस्मानाबाद येथील हे शेतकरी बोरीवली येथील बाजारामध्ये नियमीतपणे भाजी विक्री करतात.  बीएमसीचे अधिकारी व पोलीस भाजी विकण्यास मनाई करून हप्ता मागत असल्याचा आरोप त्या शेतक-यांनी केला. वारंवार घडणा-या प्रकरणामुळे कंटाळलेल्या शेतक-यांनी थेट मंत्रालयावर धडक देत मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर भाजी फेकून संताप व्यक्त केला. त्यामुळे मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराबाहेरील रस्त्यावर भाज्यांचा सडा पसरला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *