एल्गार मोर्चा निघणारच ; प्रकाश आंबेडकर 

मुंबई :  संभाजी भिडेंच्या अटकेसाठी उद्या मुंबईत निघणाऱ्या एल्गार मोर्च्याला पोलिसांनी परवानगी नाकारलीय. मात्र परवानगी मिळो अगर न मिळो एल्गार मोर्चा निघणारच अशी रोखठोक भूमिका भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी घेतलीय. त्यामुळे उदयाच्या मोर्चे कडे महाराष्ट्राचे लक्ष वेधलंय.

कोरेगाव भीमा हिंसाचाराला संभाजी भिडे जबाबदार असल्याचा आरोप आंबेडकर यांनी केलाय.या प्रकरणात संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्या अटकेची मागणी त्यांनी केलीय. एकबोटे यांना अटक करण्यात आलीय मात्र भिडे याना अटक करण्यात आली नसल्याने, भिडे यांच्या अटकेच्या मागणीसाठी आंबेडकर यांनी एल्गार मोर्चाची हाक दिलीय. संभाजी भिडे याना अटक  होईल अशी अपेक्षा होती. पण सरकारकडून काहीच हालचाल दिसून येत नाही. सरकारने लोकशाहीचा गळा दाबला असून , आंदोलनाचा अधिकार नाकारल्याची टीका आंबेडकर यांनी केलीय. सरकारने मारेकऱ्यांना मोकळे सोडले आहे तर मार खालेल्यावर गुन्हा दाखल केला हे दुर्दैव आहे असे आंबेडकर म्हणाले. भायखळा राणी बाग ते आझाद मैदान असा एल्गार मोर्चा काढण्यात येणार असून, विधानसभेला घेराव घालण्यात येणार असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *