१५ दिवसात रेल्वेचे ब्रीज फेरीवाला मुक्त करा, अन्यथा खळ्ळ खटयाक :
राज ठाकरेंचा रेल्वे प्रशासनाला इशारा

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रेल्वे प्रशासनासह भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या फूटओव्हर ब्रीजवरील फेरीवाल्यांना १५ दिवसात हटवा अन्यथा १६ व्या दिवशी जो संघर्ष होईल त्याला रेल्वे प्रशासन जबाबदार असेल असा सज्जड इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना रेल्वे प्रशासनाला दिला.
एल्फिन्स्टन दुर्घटनेच्या पार्श्चभूमीवर राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेचा संताप मोर्चाचे आयोजन करण्यता आलं होत मेट्रो सिनेमा ते चर्चगेट असा भव्य मोर्चा काढण्यात आला होता. राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने रेल्वे प्रशासनाच्या अधिका-यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केलं. त्यानंतर राज यांनी ट्रकवर उभं राहून भाषण केलं. बुलेट ट्रेनला आमचा विरोध कायम असून, सुरेश प्रभूंनी बुलेट ट्रेनला विरोध केल्यानेच त्यांना मंत्रीपदावरून हटवल्याचा आरोप राज यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदीवर जोरदार हल्ला चढवित मोदी खोटारडे असल्याचंही ते म्हणाले. न्यायालयाने आणि माध्यमांनीही सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात आवाज उठविला पाहिजे असे आवाहनही राज यांनी केलं.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *