जयस्लीनच्या मृत्यूला ठेकेदार आणि लोकप्रतिनिधीच जबाबदार

कल्याण- कल्याण पश्चिमेतील संतोषीमाता- कर्णिक रोड येथे जयस्लीन कुट्टी या सहावीत शिकणा-या शाळकरी मुलाचा ट्रकच्या अपघातात मृत्यू झालाय. सोमवारी सायंकाळी क्लासला जात असतानाच हा अपघात घडलाय. येथील रस्त्याचे काँक्रीटीकरणाच्या कामातील ठेकेदाराची दिरंगाई, महापालिका अधिकारी आणि  लोकप्रतिनिधींचे झालेले दुर्लक्ष हेच या अपघाताचे मुख्य कारण असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे . त्यामुळे हेच जयस्लीनच्या मृत्युला जबाबदार आहेत. यांच्यावरही मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. महात्मा फुले चौक पोलिसांनी ट्रकचालक राजा माळी याला अटक केली आहे. गेल्या 5 वर्षांपासून या परिसरात सिमेंट कॉंक्रीटचे काम सुरु असून या रस्त्यांवर असलेल्या डिव्हायडरसाठी खड्डे खोदण्यात आले. मात्र डिव्हायडर झालेच नाही. ते खड्डे तसेच असल्यानेच जयस्लीनचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी केलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *