भाजपच्या सरपंचाची दोघा भावांना जीवे ठार मारण्याची धमकी 

भिवंडी : तालुक्यातील काल्हेर गावचे भाजपचे  सरपंच आणि त्यांच्या सहकाऱ्यानी रूम तोडून  महिलांना शिवीगाळ करून त्यांच्या पतींना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने गावात दहशतीचे वातावरण पसरले असून, नारपोली पोलीस ठाण्यात सरपंचासह दोघांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे , भाजपच्या जोरावर  आमच्या जीवाला धोका निर्माण झाल्याने  भयभीत झालेले दोघे भाऊ मुख्यमंत्री यांच्याकडे धाव घेऊन कारवाईची मागणी करणार आहे .
या बाबत अधिक वृत्त असे की काल्हेर गावातील रत्ना सहदेव उमराटकर आणि त्यांची जाऊ त्यांच्या रूमवर बुलडोजर फिरवून त्याला विरोध केल्याने काल्हेर गावचे भाजपचे सरपंच श्रीधर जयवंत पाटील आणि त्यांचे साथीदार  हरेश रामदास जोशी यांनी दोन्ही महिलांना शिवीगाळ करून त्यांचे दिर प्रकाश उमराडकर आणि सहदेव उमराटकर यांना जीवे ठार मारू अशी धमकी दिली आहे. या काल्हेर गावामध्ये नेहमीच निर्घृण हत्या झाल्याच्या घटना घडत आहे त्यामुळे हे कुटूंब दहशतीखाली सापडले आहे. केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आहे. मुख्यमंत्री , गृहमंत्री सुद्धा भाजपचे असल्याने आमचं कोणीही काही वाकड करू शकत नाही असे त्यांच्याकडून धमकावण्यात आलय तसेच त्यांच्यावर  क्रिमिनल  गुन्हे दाखल असल्याचे उमराटकर दोघे भाऊ प्रचंड भयभीत झाल्याने त्यांनी नारपोली पोलीस ठाण्यात धाव घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली , मात्र पोलिसांनी फक्त दोघांच्या विरोधात अदखल पात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.  सरकार फक्त भाजपच्या पदाधिकारीसाठी आहे की सामान्य नागरिकांसाठी असा सवाल प्रकाश उमराटकर यांनी उपस्थित केला असून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कडक कारवाई करण्याची मागणी करणार आहे असे भयभीत झालेल्या दोघा भावांनी पत्रकारांकडे व्यथा मांडली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *