ठाणे जिल्हयात जमावबंदीचा आदेश लागू 
ठाणे : भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचाराचे पडसाद राज्यात उमटत असल्याने काही समाजकंटकाकडून दंगलीचे वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे प्रकार दिसून येत आहेत त्याच पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी ठाणे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी ठाणे जिल्हयात दि २ ते ४ जानेवारी पर्यंत जमावबंदीचा आदेश लागू केलाय. ठाणे जिल्हयातील सर्व पोलीस ठाण्यांना हे आदेश देण्यात आले असून,जमाव बंदीचा आदेश ४ जानेवारी रात्री १२ वाजेपर्यंत अंमलात असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *