अंबरनाथमध्ये साकारणार राज्यातील पहिल्या क्रमांकाचे “जागतिक दर्जाचे शुटींग रेंज”

८ डिसेंबरला पालकमंत्रयाच्या हस्ते भूमिपुजन : खासदार श्रीकांत शिंदेच्या प्रयत्नांना यश 

अंबरनाथ : ठाणे जिल्हयातील पहिले जागतिक दर्जाचे शुटींग रेंज अंबरनाथ येथे साकारण्यात येणार आहे. शुटींग रेंजच्या बांधकामचे भूमिपुजन शुक्रवार दि. ०८ डिसेंबर, २०१७ रोजी दुपारी १ वा. सार्वजनिक बांधकाम मंत्री व ठाणे जिल्हा पालकमंत्री ना. श्री. एकनाथजी शिंदे यांच्या शुभहस्ते होणार आहे. कल्याणचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने हे शुटींग रेंज साकारण्यात येत आहे. अंबरनाथ पश्चिमेतील विम्को नाका येथील नगरपरिषदेच्या सुमारे सवा एकर जागेवर १० मी., २५ मी. व ५० मी. चे ३ लेनमध्ये जागतिक दर्जाचे शुटींग रेंज बांधण्यात येणार आहे अशी माहिती अंबरनाथ शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी दिलीय. त्यामुळे कल्याण पट्टयातील नेमबाज खेळाडूंना सरावासाठी मुंबईत जाण्याची गरज भासणार नाही.
महाराष्ट्रात काही ठिकाणी १० मीटरचेच शुटींग रेंज उपलब्ध आहेत. परंतु , मुंबईत फक्त वरळी येथे १० मी., २५ मी. व ५० मी. या तीन लेनचे शुटींग रेज बांधण्यात आले आहे. जागतिक शुटींग स्पर्धांमध्ये खेळाडूंना भाग घेण्यासाठी २५ मी व ५० मी. ची रेंज आवश्यकता असते. अंबरनाथ, बदलापुर, उल्हासनगर तसेच लगतच्या ग्रामीण भागातील उदयोन्मुख नेमबाज खेळाडूंना २५ व ५० मी. रेंजच्या शुटींग सरावासाठी मुंबईपर्यंत प्रवास करावा लागतो. अनेक खेळाडूंना आर्थिक परिस्थितीमुळे मुंबईपर्यंत जाणे शक्य हेात नाही. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी खेळाडूंची अडचण लक्षात घेऊन कल्याण लोकसभा मतदार संघामध्ये अंबरनाथ शहरात जागतिक दर्जाचे शुटींग रेंज व्हावे यासाठी सन २०१५ पासून सातत्याने पाठपुरावा सुरु केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *