ठाणे  :  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात सभा पार पडली या सभेत ठाकरे यांनी शिंदेंवर जोरदार हल्ला केला. मिंधे नावाचे मुख्यमंत्री हे मोदींसमोर वळवळ करणारे मांडूळ आहे.  रोज घालीन लोटांगण सुरु आहे अशा शब्दात ठाकरेंनी शिंदेंवर प्रहार केला. 

 ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये शिवसेना उद्धव  बाळासाहेब पक्षाचा मेळावा पार पडला त्या मेळाव्यात ते बोलत होते. पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, मी ठाणेकरांचे कौतुक करण्यास करण्यास आलो आहे. सर्वकाही पळवलं तरी सव्वापाच लाख पाठीशी उभे राहिले. कल्याणमध्ये मिधेंचे कार्टे उभे होते, आमच्या शिवसैनिकाचा पराभव करण्यासाठी विश्वगुरुंना बोलवावे लागले. मुंबईमध्ये कीर्तिकरांची सीट ४८ मतांनी गेली ही चोरलेली सीट आहे. पदवीधरमध्ये शिवसैनिक निवडून दिला. कोकण माझंच आहे. हे सगळे चाळे अब्दालीचे चाळे आहे. मी अब्दली का बोललो? रागाने नाही बोललो. अहमदशाह अहमदाबाद शाह नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर औरंगजेब महाराष्ट्रवर चालून आला. औरंगजेबाच्या घोड्यांना पाणी पिताना संताजी धनाजी दिसायचे. तसे अब्दालीच्या खेचऱ्यांना पाण्यात उद्धव ठाकरे दिसतोय. तु्म्हाला महाराष्ट्राचं पाणी काय आहे हे शिवसेना दाखवून देईल.

संजय राऊत म्हणाले,  मिंधे लबाडी केल्याशिवाय जिंकू शकत नाही. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात लबाडी केली. लाडक्या बहिणीची किंमत फक्त दीड हजार केली. लाडक्या आमदारांना ५० कोटी दिले. हा गुजरात पॅटर्न आहे. उद्धव ठाकरे दिल्लीत होते,अभिमान वाटावा असा दिल्ली दौरा होता. जेव्हा उद्धव ठाकरे दिल्लीत आले तेव्हा अहमद अब्दाली घाबरून घरी बसला. तुमची कबर खणायला आम्ही दिलीत आलो. तुमच्या पोरा बाळांना दिल्लीत पाठवायचा काम उद्धव ठाकरेंनी केले. महाराष्ट्रात घटनाबाह्य सरकार आहे,तोतयांचे  सरकार आहे. शेख हसीना जस पळवून लावलं त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील जनता पळवून लावेल, असंही संजय राऊत म्हणाले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *