कल्याण : कल्याण पश्चिमेत असलेल्या रेती बंदर परिसरातील जनावरांचे तबेले पाण्याखाली गेले आहेत. दुभत्या जनावरांची पर्जन्यवृष्टीमुळे आबळ झाली आहे. गोठ्यांमध्ये पुराचे पाणी घुसल्याने वासरे-पारडूंसह शेकडो गायी आणि म्हशींना रस्त्यावर आणावे लागले आहे. त तबेल्यांमध्ये घुसलेल्या पाण्याचा निचरा होईपर्यंत या जनावरांची देखभाल आणि चारा-पाण्याची व्यवस्था त्यांच्या मालकांना उघड्यावरच करावी लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *