माथेरान शटल सेवेच्या फे-या वाढवा : पर्यटकांची मागणी 

कर्जत (राहुल देशमुख) : माथेरान मिनीट्रेन शटल सेवेच्या मर्यादीत फे- या असल्याने नेरळ मार्गे मुंबई पुण्याकडे जाणा- या प्रवाशांना मध्य रेल्वे गाडयांमधून प्रवास करता येत नाही. त्यामुळे शटल सेवेच्या फे-यांमध्ये बदल करून त्या  पहाटे ५ ४५ पासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत असाव्यात. त्यामुळे नेरळ अथवा कर्जत येथे प्रवास करण्यासाठी दस्तुरी येथून मिनीबसच्या नियाजीत वेळापत्रकानुसार तसेच शेवटची सव्वा सहा वाजता सुटणा- या मिनीबससेवेचा लाभ  स्थानिकांसह पर्यटकांना घेता येईल. त्यामुळे रेल्वे प्रशासनोन तातडीने दखल घेऊन माथेरान शटल सेवेच्या फे- या वाढवाव्यात अशी मागणी आता जोर धरू लागलीय.

दीड वर्षांपासून बंद असलेली माथेरानची मिनिट्रेन अनेक अडचणींनंतर स्थानिकांच्या संघटनात्मक धोरणामुळे आणि सर्वपक्षीय नेतेमंडळींच्या सातत्याने केलेल्या  पाठपुराव्यामुळे सुरू करण्यात आली असली तरीसुद्धा अद्याप नेरळ -माथेरान अशी गाडी सुरू केलेली नाही. अमनलॉज ते माथेरान स्थानका दरम्यान शटल सेवा सुरू करण्यासाठी सुद्धा रेल्वे प्रशासनाकडे खूपच पाठपुरावा करावा लागला होता.  शटल सेवा सध्यातरी पर्यटकांसाठी उत्तम पर्याय आहे.या माध्यमांतून रेल्वे प्रशासनाला भरीव उत्पन्नाचे साधन प्राप्त झालेले आहे.३० ऑक्टोबर रोजी सुरू करण्यात आलेल्या शटल सेवेने अवघ्या काही दिवसांत पाच लाखांपेक्षा अधिक उत्पन्न मिळवून दिले आहे.रेल्वे प्रशासनाला एवढे भरीव उत्पन्न मिळून देखील त्यांची या गाडी बाबतीत  प्रशासनाची उदासिनता दिसून येतेय .दीड वर्षांपासून सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे शटल सेवा नाममात्र सुरू केलेली असून इथे वाढलेला पर्यटकांची अमर्याद संख्या पाहता कित्येकदा रेल्वे स्थानकात तिकिटासाठी ताटकळत उभे रहावे लागत आहे अनेकदा गर्दी मुळे वाद सुध्दा होताना दिसत आहेत.त्यातच या शटलला पेसेंजर्सच्या तीन बोगी असून दोन मालवाहतुकीसाठी बोग्या आणि एक प्रथम श्रेणीची बोगी आहे.दोन इंजिन कार्यरत असतात.परंतु यांतील पाच बोग्या या पर्यटकांना सेवा देण्यासाठी करणे गरजेचे असतांना सुद्धा याकडे अधिकारी वर्ग जाणीवपूर्वक कानाडोळा करीत आहेत.त्यांना या गाडी बाबतीत काहीएक स्वारस्य दिसत नाही.अनेक कामगार नेरळ येथे असताना त्यांना इकडे वर्ग करून घेतले जात नाही.जुन्या कामगारां ऐवजी येथे नवीन कामगार असणे जरूरी बनले आहे.कारण मागील काळात ०८ मे २०१५ रोजी अमनलॉज स्टेशन जवळच किरकोळ अपघात झाला होता.तो अधिकारी आणि काही कामचुकार कर्मचार्यांमुळेच झाला असल्याचे बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *