केापर्डी प्रकरणातील तिन्ही आरोपी दोषी,  २२ नोव्हेंबरला शिक्षेची सुनावणी

अहमदनगर – संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या कोपर्डीतील बलात्कार आणि हत्याप्रकरणात शनिवारी अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाने जितेंद्र शिंदे , संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या तिघांना दोषी ठरवले असून २२ नोव्हेंबरला या शिक्षेची सुनावणी होणार आहे. अत्याचारीत मुलीच्या कुटूंबियांन दोषींना फाशी शिक्षेची मागणी केलीय.
अहमदनगरमधील कर्जत तालुक्यातील कोपर्डी गावात १३ जुलै २०१६ रोजी नराधमांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या तिघांना अटक करण्यात आली होती. या घटनेमुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती. राज्यभरात काढण्यात आलेल्या मराठा मूक क्रांती मोर्चाच्यावेळी कोपर्डी प्रकरणातील दोषींना फाशी देण्यात यावी, अशी प्रमुख मागणी लावून धरण्यात आली होती. शनिवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास न्यायालयीन कामकाजाला सुरूवात झाली. कडक पोलीस बंदोबस्तामध्ये कोपर्डी प्रकरणातील तीनही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले होते. तसेच न्यायालयात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम व आरोपींचे वकील योहान मकासरे हे देखील हजर होते. न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी खटल्याचा निकाल दिला. कट रचून मुलीवर अत्याचार करणे, हत्या करणे, बालकांच्या लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे. येत्या २१ आणि २२ तारखेला या खटल्याची पुढील सुनावणी होईल. दोषींच्या शिक्षेवर युक्तिवाद केला जाणार असून त्यांना शिक्षा काय होणार याचा निकाल २२ नोव्हेंबरला दिला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *