कल्याण : अडीच ते तीन महिन्यांपूर्वी पुण्याहून एका अल्पवयीन मुलीला कल्याणला आणून तिचे लग्न लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. तसेच लग्नानंतर मुलीचा शारारीक व मानसिक छळ करत ब्लॅकमेल करत मारल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकारानंतर कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात मुलीच्या नातेवाईकांनी गोंधळ घालत मुलाला काळे फासले.

पुण्याला राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला अडीच ते तीन महिन्यांपूर्वी नेहा जाधव या महिलेने कल्याण नजीकच्या गाळेगांव येथे आणून आपलं भाऊ रोहन म्हस्के याच्याशी लग्न लावून दिले. यानंतर तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. या छळाला कंटाळून या मुलीने आपल्या वडिलांना फोन करत आपल्याला येथून घेऊन जाण्याची मागणी केली. मात्र वडील पुण्याहून कल्याणला येईपर्यंत या मुलीला तिच्या सासरच्या लोकांनी मारल्याचा आरोप मुलीच्या वडिलांनी केला आहे.


या संतप्त प्रकारानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या दिपक निकाळजे गटाचे जिल्हाध्यक्ष धर्मा वक्ते आणि शालिनी वाघ यांनी कार्यकर्त्यांसह रुक्मिणीबाई रुग्णालयात जात मुलीच्या वडिलांना आधार दिला. तसेच अल्पवयीन मुलीच्या मृत्यूनंतर देखील उर्मट उत्तरं देणाऱ्या तिच्या नवऱ्याला काळे फासत चोप दिला. तसेच या मुलाला आणि त्याच्या बहिणीला अटक करत कारवाई करण्याची मागणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *