ठाणे : शहापूर तालुक्यातील नांदवळ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरपंच म्हणून भारती निलेश खारीक तर सदस्यपदी दीपक चिंतामण जवरे व जयेश दीपक जवरे हे बिनविरोध निवडून आले. माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करताच शहापूर तालुक्यात राष्ट्रवादीला विजय संपादन झालं आहे.

नवनियुक्त विजयी झालेल्या सरपंच व सदस्य पदाधिकाऱ्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी खास करून अभिनंदन करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी सामाजिक न्याय जिल्हा अध्यक्ष अविनाश थोरात, अध्यक्ष रवींद्र पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सतीश पातकर, रमेश परटोळे, राजेंद्र परदेशी, बाळकृष्ण सासे व निलेश खारीक आदी राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *