डोंबिवली पश्चिमेकडील पादचारी पुलावर नेहमीचाच अंधार 

डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेच्या बाजूला रेल्वे स्थानकालगत असलेल्या रेल्वे पादचारी पुलावरील लाईट नेहमीच बंद असल्याने रात्रीच्यावेळी प्रवाशांना अंधारातूनच पुलावरून ये जा करावी लागते. डोंबिवली पूर्व व पश्चिमेला जोडणारा हा पूल आहे. पश्चिमेकडील रेतीभवन इमारतीसमोरील पुलावर हा अंधार पसरलेला असतो. अगदी रेल्वे स्टेशनच्या समोर हा पूल असतानाही या अंधाराच्या साम्राज्याकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले आहे. जागरूक नागरिक महेश काळे यांनी हा फोटो सिटीझन जर्नलिस्टकडे पाठवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *