भिवंडीत पुन्हा उभं भातपीक जाळलं 

भिवंडी – परतीच्या पावसामुळे सर्वत्र   भातपिकाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे , हातातोंडाशी आलेला घास डोळ्यादेखत हातातून जात असताना शेतकरी चिंताग्रस्त  झाला आहे , त्यामध्ये  सरकारी यंत्रणेच्या  अनास्थेमुळे भिवंडी तालुक्यातील  शिरोळे गावातील शेतकरी नारायण पाटील यांनी  उभे भातपीक जाळले आहे त्या पाठोपाठ सांगाव येथेही शेतकऱ्यांनी भात पीक जाळून आपला राग व्यक्त केला आहे  , त्यामध्ये भातावर पडलेला खोडकीडा आशा  द्विधा मनस्थितीत असलेल्या या शेतकऱ्यानी आपले भातपिक जाळून राग व्यक्त केला आहे , मात्र याची शासन गंभीर दखल केव्हा घेणार असा प्रश्न शेतकऱ्याला पडला असून  80 टक्के भात पिकाचे नुकसान झाल्याने उरलेला 20 टक्के भात खरेदी करण्यासाठी भात खरेदी केंद्र सुरू करा अशी मागणी शेतकरी करीत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *