दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने निर्णायक बहुमताकडे वाटचाल सुरू असतानाच दणदणीत विजयावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या निवडणुकीत एका बाजूला भांडवलदारांची ताकद होती तर दुस-या बाजूला जनतेची शक्ती होती. जनतेच्या शक्तीने भांडवलदाराशाहीचा ताकदीचा पराभव केला आहे. अशा शब्दात राहुल गांधी यांनी विजयावर बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

राहुल गांधी म्हणाले की, मी कर्नाटकातील जनतेचे काँग्रेस पक्षाचे नेते कार्यकर्ते सर्वांचे अभिनंदन करतो. कर्नाटक मे नफरत की बाजार बंद हुई है मोहब्बत की दुकान खुली है. काँग्रेस पक्ष कर्नाटकात गरिबांच्या बाजूने उभा राहिला. गरिबांच्या मुद्द्यावरच आम्ही लढलो. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आपण द्वेष किंवा चुकीचे शब्द वापरून ही लढाई लढलो नाही. आम्ही प्रेमाने आणि आपुलकीने लढलो. आम्ही निवडणुकीतील प्रचारादरम्यान पाच आश्वासने दिली आहेत ती पहिल्याच कॅबिनेट बैठकीत पूर्ण करू अशी ग्वाही राहुल गांधी यांनी दिली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *