शेतकरी आणि नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी भिवंडी प्रांत कार्यालयावर मोर्चा
भिवंडी : भिवंडी आणि शहापूर तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी आज दुपारी भारताचा क्रांतिकारी मॅक्सवादी पक्षाने भिवंडी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे पैसे खात्यावर जमा करा ,अवकाळी पावसामध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई द्या ,आदिवासी फ्लॅट धारकांच्या कब्जात असलेले क्षेत्र नावे करा ,आदिवासी विकास निधी दुसरीकडे वापरू नका ,नोटा बंदीमध्ये मृत्यू झालेल्या कुटुंबाला 10 लाखाची मदत करा ,ग्रामीण भागातील वीज पुरवठा सुरळीत करा, वीज बिल वापरा पेक्षा जास्त आकारणी बंद करा ,रोजगार हमी योजना राबवा ,ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्त करा अशा मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *