ठाणे : भिवंडीत तीन मजली इमारत कोसळल्याची घटना घडली या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान यांच्या मदतीने सदर इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या ९ रहिवाशांची सुटका करण्यात आली असून, त्यांना शासकीय उपजिल्हा रुग्णालय भिवंडी येथे उपचारासाठी दाखल केले आहे. या इमारतीच्या ढिगा-याखाली २२ जण अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत ढिगा-याखालून ११ रहिवाश्यांच्या सुखरूप सुटका करण्यात आली असून, ०२- रहिवाश्यांचा मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आला आहे. नवनाथ सावंत (वय- ४० वर्षे), लक्ष्मीदेवी रवी म्हातो ( वय २६ वर्षे) अशी त्यांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी दोनच्या सुमारास वर्धमान कंपाऊंड, वाल व्हिलेज, दापोडा मार्ग, भिवंडी ग्रामीण, भिवंडी. या ठिकाणी मे. एम.आर.के. फुड्स ही तीन मजली इमारत कोसळल्याची घटना घडली. सुमारे १० वर्षे जुनी इमारत होती. सदर घटनास्थळी इमारतीमध्ये अंदाजे २२-रहिवाशी अडकले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सदर घटनास्थळी प्रांत अधिकारी, तहसिलदार-भिवंडी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी-ठाणे महानगरपालिका, ग्रामसेवक-भिवंडी ग्रामीण,पोलीस उपायुक्त परिमंडळ-०२, भिवंडी पोलीस कर्मचारी, दंगल गृहस्थ पोलीस, शासकीय उपजिल्हा रुग्णालय भिवंडीचे कर्मचारी-१० रुग्णवाहिका, भिवंडी अग्निशमन दलाचे जवान-०१ इमर्जन्सी टेंडर, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (NDRF) अधिकारी कर्मचारी ०१-आयशर टेम्पोसह, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे (TDRF) जवान-०१ बस वाहनासह, आपत्ती व्यवस्थापन कक्ष कर्मचारी बचाव कार्य करीत आहेत.

https://twitter.com/cjournalist4/status/1652282787834245122?s=20

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *