टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर विजय
मुंबई : विराट कोहलीच्या टीम इंडियाने कोलकात्याच्या दुसऱ्या वन डे सामन्यात ऑस्ट्रेलिचा 50 धावांनी धुव्वा उडवित दणदणीत विजय मिळविला, भारताने या विजयासह पाच वन डे सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली.
टीम इंडियानं या सामन्यात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 253 धावांचं आव्हान दिलं होतं. पण भारताच्या प्रभावी आक्रमणासमोर ऑस्ट्रेलियाचा अख्खा डाव 202 धावांत गडगडला.कर्णधार विराट कोहलीचं एकतिसावं शतक अवघ्या आठ धावांनी हुकलं. त्यानं 107 चेंडूंत आठ चौकारांसह 92 धावांची खेळी उभारली. अजिंक्य रहाणेनं सलामीला 64 चेंडूंत सात चौकारांसह 55 धावांची खेळी केली. चायनामन गोलंदाज कुलदीप यादवनं या सामन्यात हॅटट्रिक साजरी करून भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. भुवनेश्वर कुमारनं तीन, तर हार्दिक पंड्या आणि यजुवेंद्र चहलनं प्रत्येकी दोन दोन विकेट्स काढून त्याला छान साथ दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *