ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या दादोजी कोंडदेव स्टेडियमवर यंदा पाहिल्यांदाच विजय हजारे ट्रॉफीच्या रणजी सामने होणार असल्याने प्रशासनाच्यावतीने विशेष तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे ठाण्यातील क्रिकेट चाहत्यांसाठी ही मोठी गूडन्यूज आहे.त्यामुळे ठाणेकरांना प्रत्यक्ष स्टेडियमवर जाऊन सामन्याचा आनंद लुटता येणार आहे.


यंदा विजय हजारे ट्रॉफीच्या पाच मॅच ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियमवर होणार आहेत. ६ आणि ७ डिसेंबर,२०२१ रोजी या स्पर्धेतील सहभागी संघांचे सराव सत्र दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे होणार असून ८, ९, ११, १२ आणि १४ डिसेंबर,२०२१ रोजी प्रत्यक्ष सामने होणार आहेत. महापौर नरेश गणपत म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या सूचनेनुसार क्रीडा अधिकारी मिनल पालांडे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा विभागाकडून दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये खेळपट्टी, सीमारेषा, प्रेक्षागृह तसेच इतर आवश्यक ती सर्व कामे पूर्ण करण्यात आली आहेत.

………..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *