ठाणे : गड-किल्ल्यांच्या विकासासाठी स्वच्छतेसाठी कार्यरत असलेली शिवशंभु प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेच्यावतीने किल्ले घोडबंदर येथे रविवारी स्वच्छता मोहीम राबिण्यात आली. यावेळी शेकडो प्लास्टिक व दारुच्या बाटल्यांचा खच जमा करण्यात आला.
संस्थेचे प्रदेश अध्यक्ष सत्यवान जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी ही स्वच्छता मोहिम रविवारी राबविण्यात आली. यावेळी गडाच्या परिसरातील पाण्याच्या बाटल्या, प्लास्टीक जमा करण्यात आल्या. पाण्याची टाकी स्वच्छ करण्यात आली. गडाचा परिसर स्वच्छ करण्यात आला. या मोहिमेत 20 शिवसेवक, शिवसेविका सहभागी झाले होते.