अंबरनाथ : समीर वानखेडे यांच्या केसाला जरी धक्का लागला तर याद राखा तुमची खैर नाही अशा शब्दात भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनला इशारा दिलाय. अंबरनाथमध्ये कार्यकर्ता मेळाव्यात सोमय्या आले होते त्यावेळी त्यांनी आघाडी सरकारावर जहरी टीका केली.

गेल्या काही दिवसांपासून एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यात चांगलीच जुंपली आहे. मलिकांकडून वानखेडे यांच्यावर टीका केली जात आहे. वानखेडे यांना तुरूंगात टाकण्याची धमकी त्यांनी दिली होती त्याच पार्श्वभूमीवर सोमय्या यांनी मलिकांवर निशाना साधलाय. नवाब मलिक हे शरद पवारांचे प्रवक्ते आहेत की ठाकरे सरकारचे अशी जाहीर करावे आणि त्यांनंतर वानखेडेवर आरोप करावेत असेही सोमय्या म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका करीत, जरंडेश्वर साखर कारखान्याचे खरे मालक अजित पवार, सुनेत्रा पवार आणि त्यांच्या बहिणी आहेत जर हिंमत असेल तर हायकोर्टात प्रतिज्ञापत्र द्या आणि माझयावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करा असेही आव्हान सोमय्या पवारांना दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *