ठाणे : ठाण्यात फेरीवाल्यांची दादागिरी दिवसेंदिवस वाढत असल्याची दिसून येत आहे. फेरीवाल्यांवर कारवाईसाठी गेलेल्या पालिकेच्या अधिका-यावर एका फेरीवाल्याने चक्क चाकू उगारला आहे. आधी बोटं छाटली आता गळा कापू ..अशी धमकी देण्यापर्यंत फेरीवाल्यांची मजल गेलीय. मात्र फेरीवाल्यांच्या दादागिरीपुढं प्रशासन हतबल झाल्याचे दिसून येत असून सत्ताधा-यांनीही नांगी टाकली का ? असा सवाल ठाणेकरांमध्ये उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे पातलीपाडा येथील पालिका आयुक्तांच्या निवास्थानाजवळील असलेल्या परिसरात हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे पालिकेचे पथक अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईसाठी गेलेले असतानाच एका नारळ विक्रेत्याने एका कर्मचा-यावर बोट कापली आता सरळ गळा कापेन अशी उघड धमकी देत हातातील चाकू उगारण्याचा प्रयत्न केला. मात्र पालिकेतील कर्मचारी त्या फेरीवाल्यावर धावून गेल्यानंतर त्याने चाकू खाली ठेवला. त्यामुळे सुदैवाने पिंपळे यांच्यावरील हल्ल्यांची पुनरावृत्ती टळली.

या फेरीवाल्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र पालिका अधिका-यांना धमकी देण्याची इतकी हिंमत फेरीवाल्यांमध्ये कुठून येते. फेरीवाल्यांच्या वाढत्या दादागिरीला वेसन कधी घालणार ? असा सवाल यानिमित्त उपस्थित होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *