दिवा:- दिव्यातील जनतेला पिण्यासाठी देखील आवश्यक पाणी मिळावे यासाठी भाजपचे रोहिदास मुंडे व रोशन भगत यांनी दातीवली तलाव येथे लक्षवेधी धरणे करत पाणी हक्क आंदोलन केले.या आंदोलनाला पाणी टंचाईने त्रस्त नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत पालिकेने जनतेला किमान पिण्याचे पाणी उपलब्ध करून घ्या अशी मागणी यावेळी आंदोलन मध्ये सहभागी झालेल्या नागरिकांनी केली.

जनतेला मुबलक पाणी मिळावे यासाठी पानी हक्क आंदोलन आम्ही छेडले होते.कोरोना मुळे हे आंदोलन स्थगित करण्यात आले होते मात्र आता येथील जनतेच्या संयमाचा बांध फुटला असून सततच्या पाणी टंचाईचा निषेध म्हणून गांधी जयंती निमित्त दातीवली तलाव येथे लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आले

आजही येथील जनतेला पिण्यासाठी पुरेसे मुबलक पाणी मिळत नाही.पाणी विकत घेऊन येथील जनता बेजार झाली आहे. ज्या नव्या जलवाहिनी टाकण्यात आल्या त्याचे काय झाले?अजून पाणी प्रश्न का सुटत नाही?जनतेला अजून किती दिवस पालिका सत्ताधारी छळणार आहेत?असे सवाल आंदोलनकर्ते रोहिदास मुंडे व रोशन भगत यांनी उपस्थित केले आहेत.भाजपचे आदेश भगत व निलेश पाटील यांनीही या आंदोलन दरम्यान पालिकेच्या कारभारावर टीका करत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *