कल्याण : कल्याण रेल्वे स्टेशनवरील फलाट क्र ६ वर एकटाच बसलेला १३ वर्षीय वयाचा मुलगा आढळून आला, मात्र त्या मुलाला घेऊन समतोल संघटनेचे कार्यकर्ते पोलीस ठाण्यात गेले. मात्र पोलिसांकडूनच त्यांचीच उलटतपासणी करीत संघटनेची चौकशी करावी लागेल असे पोलीस अधिका-याने सांगितले त्यामुळे समतोल संघटनेचे प्रमुख विजय जाधव यांनी नाराजी व्यक्त करीत पोलीस अजूनही असंवेदनशील असल्याचा आरोप केलाय.

चाईल्ड लाईन असताना तुम्ही किंवा इतर कोणतीही संस्था काम करू शकत नाही असे पोलीस अधिका-यांकडून कार्यकत्यांना सांगण्यात आले. मग सामान्य नागरिक मुलाला मदत करू शकत नाही का ? नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था मुलासाठी पोलीसाची मदत घेऊ शकत नाही का ? आजही लाखो मुले घरापासून वेगवेगळ्या कारणाने दुर होतात किंवा आणली जातात, यासाठी एक संस्था म्हणजे चाईल्ड लाईन पुरेशी आहे असे पोलिस यंत्रणेला वाटते का ? म्हणजे हे त्यांचे ज्ञान आहे असे मला वाटते. म्हणजे पोलीस असताना समाजात चोरी कशी होते असा प्रश्न उपस्थित केला तर पोलीस काय उत्तर देतील ? असे सवाल जाधव यांनी उपस्थित केलेत.

मुलाला मदत करण्याऐवजी जर भितीदायक वातावरण पोलीस ठाण्यात असेल तर ते सरंक्षण करणार की मारणार अशी चिंता कार्यकर्ते यांना साहजिकच वाटली असावी. मग बालप्रेमी पोलीस स्टेशन ही संकल्पना फक्त पेपरवरच असावी वाटते. मुलाला मदत होणे अपेक्षित आहे हे समतोल च्या कार्यकर्ते यांना वाटतेच त्यामुळे आम्ही चाईल्ड लाईन कडे मुल सोपवले, परंतु समतोलच्या पेपर वर सही चाईल्ड लाईनने दिली नाही. कदाचित त्यांना आपली केस म्हणून दाखवायची असावी हरकत नाही खरी सेवा करताना स्पर्धा कशासाठी ? असेही जाधव यांनी स्पष्ट म्हटलय.

बालगृहात मुल जाईल तेव्हा त्याला वाटेल मी असा कोणता गुन्हा केला की इथे आलोय, कारण बालगृहात मुलांना अपेक्षित असे वातावरणात नसते अशी मुलेच सांगतात, शिवाय मला मदत करताना किती गडबड आहे. मला पोलीस अंकल मदत करतील असे वाटले होते पण परंतु अशीच परिस्थिती नेहमीच राहिली तर मुलांच्या समस्या ही कमी होणार नाही तर वाढतच जाईल. अशा अनेक प्रकारच्या अडचणीत समतोल गेली १७ वर्षे सातत्याने काम करीत आहे, बालप्रेमी समाज आणि बालप्रेमी वातावरण निर्माण होण्यासाठी संघटना काम करीत असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केलय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *