मुंबई : गेल्या काही दिवसांपासून विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा निर्णय असो वा महिला सुरेक्षाचा मुद्दयावरून अधिवेशन घेण्याची सुचना असो अशा अनेक कारणांवरून महाविकास आघाडी सरकार विरूध्द राज्यपाल असा संघर्ष रंगलेला पाहावयास मिळत आहे. मात्र कोवीड यौध्दांच्या सत्कार सोहळयात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भगतसिंह कोश्यारी हे आमचे लाडके राज्यपाल असून, देशातील सर्वात मजबूत राज्यपाल म्हणून त्यांचा गौरव करीत कवितेतून महाविकास आघाडीला टोला लगावलाय.

युनायटेड बुद्धिस्ट अँड आंबेडकराईट फाऊंडेशनेच्या वतीने राजभवन येथे कोरोनायोद्धा लोकसेवा गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी राज्यपाल बोलत होते. कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले व फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रदीप जगताप उपस्थित होते.

आठवलेंची फटकेबाजी ….
मी वंदन करतो भगवान गौतम बुद्धा, माझी आहे डॉ बाबासाहेब आंबेडकरांवर श्रद्धा, कारण मी आहे दलित मूव्हमेंट चा योद्धा … अशी काव्यमय सुरुवात करून केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ये है २०२१ साल और भगत सिंह कोश्यारी है लाडले राज्यपाल ! अशी कविता सादर करीत आठवले यांनी आज देशात सर्वाधिक मजबूत राज्यपाल म्हणून भगतसिंह कोश्यारी यांचे कौतुक केले. बिहार राज्यात एकही कोरोना ची केस नसल्याची बातमी वाचण्यात आली. त्यामुळे कोरोना ला हद्दपार करण्याची आशा पल्लवित झाली आहे. करोनाला हरवून लोकांना जगवायचे ध्येय ठेवून कार्य केले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी काव्याच्या माध्यमातून करोना योद्ध्यांचे अभिनंदन केले.

देशवासीय जाती धर्मभेद विसरून संकटाचा मुकाबला करतात – राज्यपाल

भगवान बुद्ध व डॉ आंबेडकरांचे आदर्श पुढे ठेवून समाजाने एकदिलाने कार्य केले तर करोना सारखे कोणतेही संकट आले तरीही ते पराभूत होईल, आपले जात धर्म विसरून सर्व भारतीय देशात आलेल्या संकटाचा एकदिलाने मुकाबला करतात त्यामुळे कोरोना चा ही सर्वांनी एकजुटीने मुकाबला केला आहे असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

३५ कोरोना योध्दांचा सन्मान
राज्यपालांच्या हस्ते यावेळी आमदार गणपत गायकवाड, रिपाइं चे अंकुश गायकवाड, उल्हासनगरचे उपमहापौर भगवान भालेराव, पनवेलचे उपमहापौर जगदीश गायकवाड, रामदास आठवले यांच्या पत्नी सीमाताई रामदास आठवले, इंग्लंड येथील हरबन्स विर्डी, अभिनेत्री डॉ झरीन खान, श्रुती पाटील, शिलाताई अनिल गांगुर्डे, हेमंत रणपिसे, प्रा.कविता संतोष शिकतोडे, वंदना राजेश मेहता, डॉ राम वाधवा, वंदना सोनवणे, संजय मोरे, यांचेसह ३५ करोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *