अंबरनाथमध्ये प्रेमसंबधातून प्रेयसीची हत्या, प्रियकराने केली आत्महत्या

अंबरनाथ : येथील कानसई गावात एका तरूणीची हत्या करून तरूणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आचल महल्ले (२०) असे मृत तरूणीचे तर नत्राम वर्मा असे त्या तरूणाचे नाव आहे. तीन दिवसानंतर हा प्रकार उघडकीस आला असून, प्रेमसंबधातूनच हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती उजेडात आलीय.

दिवा येथे राहणारे आचल महल्ले हिचे कानसई गावात राहणाऱ्या नत्राम वर्मा (वय २५) या विवाहित तरुणाशी तिचे प्रेमसंबंध असल्याची प्राथमिक माहिती असून त्यातूनच ती दिवाळीला त्याच्या घरी राहायला आली होती. यानंतर त्यांच्यात वाद होऊन नत्रामने तिची गळा आवळून हत्या केली आणि नंतर स्वतःही गळफास घेतला. धक्कादायक बाब म्हणजे तरुणीचा मृतदेह कुजलेला असल्यानं तिची हत्या किमान ३ दिवस आधी झाली असण्याची शक्यता आहे. यानंतर सोमवारी रात्री नत्रामने स्वतः तरुणीच्या कुटुंबियांना फोन करून मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आणि मग स्वतः आत्महत्या केली. मुलीच्या नातेवाईकांनी यानंतर कानसई गावात धाव घेतली आणि हा सगळा प्रकार उघड झाला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *