बदलापूर : बेलवली येथील सबवेमध्ये पाणी साचल्याने गुडघाभर पाण्यातून अंत्ययात्रा न्यावी लागल्याची दुदैवी घटना घडलीय. ही घटना समोर आल्यानंतर प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे


बेलवली गावातील स्मशानभूमीत जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे भुयारी मार्गालगत नाला असून दरवर्षी पावसाळयात नाल्यात पाणी साचते. रेल्वे प्रशासनाने रेल्वे फाटक बंद करून संरक्षण भिंत घातल्याने बेलवली स्मशानभूमीकडे जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. मात्र गावक-यांना पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे या ठिकाणी पादचारी पुल उभारण्याची मागणी बदलापूरवासियांमधून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *