मुंबई : राज्यात मोठया उत्साहात व गाजत वाजत गणरायाचं आगमन झालं  वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते श्रीगणेशाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली “जे जे अमंगल आहे ते नष्ट होवो”,  अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी बाप्पाच्या चरणी केली “करोनाविरुद्ध जनतेला जागरूक करण्यासाठी आणि या संकटातून आपली मुक्तता व्हावी म्हणून आपण सर्वांनी एक जबाबदार नागरिक म्हणून प्रयत्न करायला हवेत असे आवाहनहीमुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा देताना केलं,

वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री व त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते आज श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते मुख्यमंत्री म्हणाले की  ‘केवळ महाराष्ट्रातच नाही तर, जिथं जिथं मराठी माणूस आहे तिथं अगदी परदेशात देखील श्री गणरायाची प्राणप्रतिष्ठा मनोभावे केली जाते. सलग दुसऱ्या वर्षी देखील आपण करोनाच्या संकटामुळे गणेशोत्सव साधेपणाने साजरा करतोय. एरव्ही गणेशोत्सव म्हटला की, गर्दी आणि जल्लोष असं चित्र असायचं. मात्र दोन वर्षापासून करोनाने आपल्या पायात बेड्या अडकवल्या आहेत. कितीही मनात असलं तरी आपल्याला काही गोष्टींवर बंधनं आणावी लागत आहेत. शेवटी उत्सवापेक्षा लोकांच्या जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देणे हे सरकार म्हणून आमचं कर्तव्य आहे.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *