ठाणे : नगरविकास विभागाकडून २० कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, त्यामध्ये कळवा, मुंब्रा, दिवाकरिता रु.५.०० कोटी, कल्याण-डोंबिवली मनपासाठी रु. १०.०० कोटी, अंबरनाथ व उल्हासनगर नगरपालिकेकरिता ५.०० कोटीचा निधी मिळणार आहे.

शहरातील स्मशानभूमी नुतनीकरण, तलाव सुशोभीकरण करणे, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांकरिता उद्यान विकसित करणे, तसेच शहरातील मुख्य चौक सुशोभीकरण आणि ग्रामीण भागातील नागरिकांसाठी भव्य सामाजिक सभागृह बांधणे. अशा विविध विकासकामांना निधी उपलब्ध व्हावा म्हणून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नगरविकास विभागाकडे सततचा पाठपुरावा सुरु ठेवला होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास विभागाकडून कल्याण लोकसभा मतदार संघातील नगरपालिकेच्या सर्वांगीण विकासकामांसाठी तब्बल २०.०० कोटी रुपयांचे विशेष अनुदान मंजूर केला आहे. निधी मंजूर झाल्याने मुलभूत सुविधांच्या कामांना गती मिळणार आहे असे खासदार शिंदे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *