मुंबई : 
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या  इयत्ता दहावीच्या परीक्षेचा यंदाचा निकाल  95.81 टक्के लागला आहे. मुली उत्तीर्ण हो​ण्याचे प्रमाण 97.21 टक्के आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी मुलींनीच बाजी मारली आहे. कोकणचा निकाल अव्वल ठरला आहे.​ सर्व विभागीय मंडळांतून मुली उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 97.21 टक्के आहे. मुले उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 94.56 टक्के आहे. मुलींचा निकाल हा मुलांच्या निकालापेक्षा 2.65 टक्क्यांनी जास्त आहे. म्हणजेच नेहमीप्रमाणे मुलांपेक्षा मुलींनी या परीक्षेत बाजी मारली आहे. एकूण 18 विषयांचा निकाल हा 100 टक्के राहिला आहे. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी राज्यातील हा निकाल जाहीर केला.  एकूण नऊ विभागीय मंडळांपैकी कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागला आहे. म्हणजेच गेल्या वर्षाप्रमाणेच याही वर्षी इयत्ता दहावीच्या कोकण विभागानेच बाजी मारली आहे. कोकणात 99.01 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सर्वांत कमी निकाल हा नागपूर विभागाच आहे. या विभागात 94.73 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 

शिक्षण मंडळाच्या वतीनं जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार राज्याचा एकूण निकाल 95.81 टक्के इतका लागला. यंदाच्या वर्षी दहावीच्या परीक्षेमध्ये दमदार कामगिरी करत कोकणातील विद्यार्थ्यांनी बाजी मारली. कोकण विभागाच्या यंदाच्या निकालाची आकडेवारी आहे 99.01 टक्के. शिक्षण मंडळाच्या माहितीनुसार या वर्षीसुद्धा निकालावर मुलींचच वर्चस्व पाहायला मिळालं. 

विभागनिहाय निकाल (टक्केवारी)

पुणे : 96.44 टक्के 
नागपूर : 94.73 टक्के 
छत्रपती संभाजीनगर : 95.19 टक्के 
मुंबई : 95.83 टक्के 
कोल्हापूर : 97.45 टक्के 
अमरावती :  95.58 टक्के 
नाशिक : 95.28  टक्के 
लातूर : 95.27 टक्के 
कोकण : 99.01  टक्के

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *