कल्याण : राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेच्या आदेशावरून विविध मागण्यांसाठी गुरूवारपासून सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप सुरू केला आहे. या संपात कल्याण येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचारी सहभागी झाल्याने या कार्यालयातील ग्राहक सेवेचे कामकाज ठप्प झाले होते.

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन परवाना नुतनीकरण, नवीन वाहन परवाना, प्रशिक्षण कामासाठी कल्याण, डोंबिवलीसह शहापूर, मुरबाड, बदलापूर, अंबरनाथ भागातून आलेेले नागरिक कामकाज ठप्प असल्याने परत गेले.

कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन कर्मचारी संघटनेचे कल्याण विभाग अध्यक्ष सुधाकर कुमावत, सरचिटणीस पावबा कंखर, कार्याध्यक्ष सचीन तायडे, मार्गदर्शक बळीराम कांबळे, शासकीय निमशासकीय शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना कल्याणचे अध्यक्ष नरेंद्र सांगळे यांच्या नेतृत्वाखाली, आरटीओ कार्यालया बाहेर निदर्शने केली. शासनाने आपल्या मागण्या मान्य करण्याची मागणी केली. जुनी निवृत्ती वेतन योजना सुरू करा, सरकारी सेवेचे कंत्राटीकरण रद्द करा, सरकारी नोकर भरतीवर बंदी उठवा, अशा अनेक मागण्यांसाठी हे बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *