उल्हासनगर: स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने उल्हासनगरमध्ये भाजप आमदार कुमार आयलानी यांच्या नेतृत्वाखाली भव्य तिरंगा यात्रा आयोजित करण्यात आली. या यात्रेत हजारो शाळकरी मुले, स्थानिक व्यापारी, योग क्लब सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते. या उत्साही सहभागाने उल्हासनगरवासीयांमध्ये देशप्रेम आणि राष्ट्रवादाची भावना अधिक दृढ झाली आहे.

यात्रेत सहभागी झालेल्या शाळकरी मुलांनी हातात तिरंगा घेत ‘वंदे मातरम’ आणि ‘भारत माता की जय’ च्या घोषणांनी वातावरण भारून टाकले. यात्रेदरम्यान, देशभक्तीपर गाण्यांवर नाचण्याचा आणि गाण्याचा आनंद नागरिकांनी घेतला.

या यात्रेत उल्हासनगरच्या माजी महापौर मीना आयलानी यांचीही उपस्थिती होती. समारोपप्रसंगी आमदार कुमार आयलानी यांनी ‘हर घर तिरंगा’ मोहिमेत उल्हासनगरवासीयांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, अशा प्रकारच्या तिरंगा यात्रांमुळे देशाची एकता आणि अखंडता अधिक बळकट होते, तसेच राष्ट्रवादाची भावना अधिक दृढ होते.

उल्हासनगरमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेली ही तिरंगा यात्रा नागरिकांच्या मनात देशभक्तीची भावना जागवणारी आणि संस्मरणीय ठरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *